डॉ.बाबासाहेब आंबेडकर - Dr. Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar

बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली महू या गावी झाला. डॉ. बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे कोकणातले असले तरी ते बाबासाहेबांच्या जन्माच्या वेळी ते मध्य प्रदेशातील बहु या गावी होते.

 बाबासाहेबांच्या आईचे नाव भिमाबाई होते. भिमरावाचा जन्माच्या आधी भीमाबाईला १३ अपत्ते झाली होती.भीमराव चौदावे रत्न होते.

 भीमरावाचे आजोबा मालोजीराव , संन्यास घेऊन घराबाहेर पडले होते. एकदा ते अचानक घरी आले असताना त्यांनी सांगितले  की,आपल्या तिसऱ्या पिढीचा एक उद्धार कर्ता पुरुष जन्माला येईल व तो तिसऱ्या पिढीचा उद्धार करेल आपल्या कुळाचे नाव सर्वत्र गाजवेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती.


भीमरावची आई लहानपणीच मरण पावली होती. भीमराव त्यांच्या आईला बये असे. त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्याने म्हणजेच मीराआत्याने केला. त्यांना आईची कधी कमी वाटू दिली नाही.

भीमरावचे बालपण अत्यंत लाडात गेले मग शिक्षणाला सुरुवात झाली शिक्षणात ते अत्यंत हुशार होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. लहानपणीच त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले होते.

 १९०७ मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी काही लोकांनी भीमरावांचा सत्कार करण्याचे ठरविले.या सत्काराच्या वेळी केळूसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र हे पुस्तक बाबासाहेबांना भेट दिले.तेव्हापासूनच बुद्धांची ओळख भीमरावाला झाली.

त्यानंतर भीमरावाचे लग्न रमाबाई सोबत झाले. भीमरावाचे शिक्षण चालूच होते. १२.१२.१९१२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बी.ए झाले. व यशवंता चा जन्म याच वर्षी झाला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जुलै १९१३ मध्ये उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेले. त्यावेळेस त्यांनी सर्व शक्ती एकवटून अभ्यासाला सुरुवात केली.


अठरा-अठरा तास अभ्यास केला. खूप भूक लागली तरीही ते दोन पाव व एक कप कॉफी पिऊन आपली भूक भागवत असत. त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.

दोन जून १९१५ ला एम. ए ची पदवी त्यांना मिळाली. जून १९१६ मध्ये पीएचडी साठी शोध निबंध सादर केला. व तो एप्रिल १९२५ मध्ये शोधनिबंध ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आला व त्यांना  PhD पदवी मिळाली.

अमेरिकेत असतांना त्यांनी स्वतः उपाशी राहून त्यांनी दोन हजार (२०००) ग्रंथ विकत घेतले. अशारीतीने अमेरिकेतील हा अभ्यासक्रम पूर्ण संपवून ते जुलै १९१६ ला भारतात परत आले.
बाबासाहेबांना PHD ची पदवी मिळाली तरीही त्यांची शिक्षणाची भूक शमली नव्हती. त्यांना डॉक्टरेट व बॅरिस्टर ही पदवी मिळवण्याची  प्रखर इच्छा होती.


त्यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात पुन्हा दोन वर्षाची स्कॉलरशिप मिळावी म्हणून अर्ज केला व त्यासोबतच त्यांचे प्राध्यापक सेलिग्मन यांचे शिफारस पत्र ही जोडले होते. त्यानंतर त्यांना एक वर्षाची स्कॉलरशिप मिळाली व पुन्हा  नोव्हेंबर १९१६ लंडनला बार एट लॉ साठी त्यांना ग्रेज इन मध्ये प्रवेश मिळाला.

बाबासाहेब अत्यंत मेहनत करून आपले शिक्षण घेत होते व एक दिवस बाबासाहेबांना बडोद्या तून पत्र आले की तुमच्या स्कॉलरशिप चा काळ संपला आहे तेव्हा तुम्ही भारतात परत या.
हे पत्र वाचल्यावर बाबासाहेबांना धक्काच बसला. पण खचून न जाता राहिलेला अभ्यासक्रम ऑक्टोबर १९१७ पासून सुरू करण्यासाठी त्यांनी लंडन विद्यापीठाकडून अनुमती घेतली. व आग बोटीने बाबासाहेब २१ ऑगस्ट १९१७ ला मुंबईत परत आले.

तेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. पण बाबासाहेबांनी अशाही परिस्थितीत अभ्यास सुरूच ठेवला.

त्यानंतर बाबासाहेबांना अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून सिडमहॅम या महाविद्यालयात नोकरी मिळाली.

१ नोव्हेंबर १९१८ ते ११ मार्च १९२० या काळात एवढ्या विद्वान प्राध्यापकाला त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र राज्यशास्त्र, नीतिशास्त्र ,मानवशास्त्र इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांनी ज्ञान संपादन केली होते. व ते जागतिक दर्जाचे महान विद्वान होते. इथेही अस्पृश्यतेचे चटके बसू लागले.

तेथील तरुणांना वाटले की महारांचा प्राध्यापक काय शिकवणार?. त्यांचा पोषाख बघून मुले अगदी स्तब्ध राहिली व त्यांची शिकवण्याची पद्धत,त्यांची ज्ञान प्रज्ञा व त्यांच्या डोक्यातील सखोल विचार बघून मुले अगदी दिपून गेले. बाहेर बसलेली मुलं इतर क्लासचे मुलंसुद्धा त्यांच्या व्याख्यानाला येऊन बसत.

त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती.ते मित्रत्वाच्या भावनेने विद्यार्थ्यांना समजून सांगायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूट बूट टाय कोट मधले त्या काळातले पहिले प्राध्यापक होते. यानंतर राहिलेल्या अभ्यास क्रम पूर्ण करण्याकरिता ते पुन्हा लंडनला १९२० जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला रवाना झाले. व त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली

लायब्ररीमध्ये अभ्यासासाठी सर्वांच्या अगोदर ते जात असे व संध्याकाळी सर्वांच्या शेवटी ते लायब्ररीतून बाहेर पडत असे.दिवसभर पोटाची भूक मारून अभ्यास करीत असत व रात्री घरी आल्यावर पुन्हा एक कप दूध व दोन बिस्किटे खाऊन पुन्हा अभ्यासाला सुरुवात करीत असत.

अशाप्रकारे अखंड तपश्चर्या अभ्यासासाठी बाबासाहेबांनी केली. जीवन १९२१ मध्ये एम एस सी ची पदवी त्यांना मिळाली. २८ जून १९२२ बॅरिस्टर पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

१९२२ च्या सुरुवातीलाच प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा प्रबंध विद्यापीठाला त्यांनी सादर केला.१९२३ ला तो प्रबंध मान्य झाला व डिसेंबर १९२३ ला डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांना विद्यापीठाने प्रदान केली.

१९२३ या काळात लंडन चा अभ्यासक्रम त्यांनी  पूर्ण केला. व १४ एप्रिल १९२३ ला भारतात परत आले. बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ इंग्लंडमधील पीएस किंग अँड कंपनी या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला.बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ आपल्या माता-पित्यांना अर्पण केला.
उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर बाबासाहेबांनी सार्वजनिक जीवना ला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मानवाच्या हक्कासाठी अनेक प्रकारची सत्याग्रह केले.

चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन,काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह, पुणे करार, हिंदू कोड बिल तयार केले. व हिंदू कोड बिलाच्या मान्यता न मिळाल्यामुळे कायदेमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला. अशाप्रकारे राजीनामा देणारे ते पहिलेच महापुरुष होते.

सर्व भारतीय महिलांचे उद्धारकर्त बाबासाहेबच आहे. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा नेता  बाबासाहेबच आहे. कामगार वर्गाचे उद्धारक, शेतकरी, शेतमजुरांचे उद्धारक कर्मचाऱ्यांना घटनेत त्यांनी आरक्षण दिले.
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतीयांना घटनेच्या माध्यमातून सर्व हक्क अधिकार दिले.

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळवून दिला. मानवाचा कल्याणासाठी संपूर्ण आयुष्यभर बाबासाहेबांनी प्राण पणाला लावला.स्वतःचा संसार विसरणारे पत्नी-मुले विसरणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.

 अशा या देशभक्त,राष्ट्र निर्माण कर्त्यास,विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व ,प्रज्ञासूर्य, महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना कोटी कोटी प्रणाम